Wednesday 15 January 2014

मनावरचं ओझं, मनाजवळच्या माणसाचं.....!!!



टाईमपास मराठी चित्रपट बघितला. त्या चित्रपटातलं एक वाक्य खूप आवडलं.  

"तू शिकलीस पण तुला बोलता येत नाही

मी नाही शिकलो पण मला बोलता येतं"

आजकाल असं खूपवेळा होत नसेल का ?? 

मनातल्या काही गोष्टी बोलायच्या असतात, सांगायच्या असतात, स्वतःची बाजू मांडायची असते, स्वतःची परिस्थिती समजावून द्यायची असते.पण होत उलटच. मनातल्या गोष्टी मनातच राहतात, सांगता येत नाही, बोलता येत नाही, स्वतःची बाजू मांडता येत नाही, आणि परिस्थिती, ही गोष्ट तर कोणी कधी कसं समजून घेईल हे सुद्धा माहित नाही

आपल्या मनात खूप काही असतं , काहीना काही भावना असते. तो राग असो किंवा प्रेम असो. मनात या गोष्टी खूप आतपर्यंत रुतलेल्या असतात. फक्त या गोष्टी आपणास बोलता नाही आणि त्याला कारण म्हणजे नात तुटण्याची भीती असो किंवा कोणासमोर वाईट व्हायचं नाही असा मनातला विचार असो. (खूपवेळा हा दुसरा विचार मनात असतो.) मनातली ती भावना आत अजून खोलपर्यंत रुतत जाते. आपण फक्त त्या व्यक्तीसमोर आल्यावर त्या भावनांना आवर घालतो.  

त्या व्यक्तीबद्दलचं प्रेम किंवा राग मनात वाढतच जातो. जी व्यक्ती एकेकाळी आपल्या मनाच्या खूप जवळ होती त्या व्यक्तीशी बोलणं वेळेनुसार अवघड होऊन जातं. एक दिवस मनात होणारी घुसमट वाढत जाते आणि त्या भावना कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्या व्यक्तीसमोर Express केल्या जातात. आणि आता चर्चा सुरु होते त्या भावना व्यक्त केलेल्या व्यक्तीविषयी...!!!

"अरे हा काय फालतूपणा आहे ? ती व्यक्ती असं का बोलली ? मला असं कधी वाटलं नव्हतं कि असं काही होईल ?" अश्या अनेक प्रश्नांवर चर्चा व्हायला सुरवात होते. काही वेळेस असे तर्क सुद्धा लावले जातात की या व्यक्तीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमुळे त्या व्यक्तीने असा फालतूपणा केला. 

त्यानंतर त्या व्यक्तीला तुच्छ असल्यासारख वागवलं जात. त्या व्यक्तीला स्वतःपासून वेगळं केलं जातं. त्या व्यक्तीने काही गुन्हा केलेला असतो का ? दोन व्यक्ती एकमेकांच्या खूप जवळच्या असतात त्या दोघांमधल्या एका व्यक्तीने आपल्या भावना स्पष्ट सांगितल्या. तर त्या व्यक्तीने त्या नात्याविषयी प्रामाणिकपणा दाखवला असं वाटत नाही का ? 
  
आजकाल दोन जवळच्या व्यक्तीमध्ये समोरची व्यक्ती काय विचार करत आहे हे समजत नाही, म्हणजे या दोन्ही व्यक्ती एकमेकांना फसवत नाही का ? असं असूनही ती व्यक्ती परिस्थिती समजावून सांगत असते, तरीही त्या गोष्टी समजून घेतल्या जात नाहीत.  

जर कोणी आपल्या भावना सांगत असेल तर ती व्यक्ती चुकीची ठरते. कारण असं काही घडणं अपेक्षित नसत. त्यानंतर त्या व्यक्तीला या झालेल्या सर्व प्रकारामुळे वेगळ केलं जातं. त्यामुळे या व्यक्तीला खूप जवळच्या त्या व्यक्तीविषयी एक राग मनात वाढत जातो. जी व्यक्ती खूप जवळची होती. ती आता खूप दूर गेलेली असते. यामध्ये एक साधा विचार केला जात नाही कि "टाळी एका हाताने वाजत नाही"

मला हि गोष्ट लिहायचा कारण असं कि एका खूप जवळच्या मैत्रिणीच्या बाबतीत हेच झालं. आणि असं तिच्याच बाबतीत नाही पण खूप लोकांच्या बाबतीतही झालं असेल.

मनातल्या भावना जवळच्या व्यक्तीला सांगितल्या जातात ते नात वाढण्यासाठी… त्या भावनांचा विचित्र विचार करून व्यक्तीला स्वत:पासून  दूर करण्यात काय अर्थ असतो हेच उमगत नाही.

तीच व्यक्ती डोळ्यासमोर आली कि प्रेम वाटायचं आता त्याच व्यक्तीचा राग येतो असं होतं आणि मनावरचं ओझं, मनाजवळच्या माणसाचं फक्त त्या ठिकाणी तसचं राहत.

© ओंकार शिंदे 
 १५ जानेवारी २०१४

No comments:

Post a Comment